वेळेपूर्वीच हार्ट अटॅक चा धोका कसा ओळखाल..!

आलिकडचा काळात हार्ट अटॅक ने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण खूप वाढले आहे . आपण दररोज व्रतमानपत्रामध्ये,न्यूज चॅनेलवर ,सोशल मेडियावर अशा प्रकारच्या बातम्या पाहतो. काही वर्षांपूर्वी हृदयरोगाचे प्रमाण ही वयाच्या ६० वर्षानंतर प्रामुख्याने दिसून येत होते पण अलीकडच्या काळात याला कोणतीही वयोमार्यादा राहिलेली नाही.यामागील कारणे आपण समजून घेतली पाहिजेत. तरुण वर्गामध्ये आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणे तसेच हृदयरोगाच्या लक्षणकडे नकळत दुर्लक्ष करणे खूप कॉमन आहे. हृदयरोगाची लक्षणे जसे की छातीत दुखणे, धडधड कारणे, घाम येणे, ,दम लागणे, चक्कर येणे, पायावर सूज येणे ई. जाणवल्यास त्वरित डॉक्टर कडे जाऊन चेक अप करणे गरजेचे आहे. तसेच ज्या व्यक्तीला डायबेटीस,ब्लड प्रेशर किंवा फॅमिली मध्ये हार्ट संबंधी आजार आहेत त्यांनी नियमित चेक अप करून घेणे गरजेचे आहे . तरुण वर्गामध्ये व्यसनाधीनता, व्यायामचा अभाव, खण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे देखील हृदयरोग वाढला आहे. त्यामुळे वेळीच आपल्या सवयी बदलून हृदया संबंधित आजरांबद्दल जागरूक राहून आपलेशरीर निरोगी ठेवावे. 

डॉ. उमेश संपतराव हंगे

हृदयरोगतज्ञ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *